Nibandhmala newspaper established
Kusumagraj family...
Kusumagraj wikipediaभारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्मिकींनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतला एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होता. कालिदासाला कविराज, कविकुलगुरू असे आदराने म्हटले जाते.
त्याच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्याला हि उपमा बहाल केली आहे.
आपल्याच क्षेत्रातल्या लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे लोक दुर्मिळ असतात.
दुर्दैवाने आपल्याकडे इतिहास चांगल्याप्रकारे लिहून ठेवण्याची परंपरा नव्हती. त्यामुळे असे महान लोक होऊन गेले तरी त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नसते.
Kusumagraj information in marathi
कालिदासाचेही असेच आहे. त्याने एकास वरचढ एक काव्ये आणि नाटक लिहिले असले तरी पद्धतशीर आत्मचरित्र लिहिले नाही. त्यामुळे त्याचा जन्म मृत्यू आणि आयुष्याचा घटनाक्रम आपल्याला नेमका माहित नाही.
आणि असे असेल तर अनेक दंतकथा पसरतात तशाच कालिदासाबद्दल सुद्धा काही समज आहेत.
त्याच्याच साहित्यातले वर्णन आणि मजकुराचा आधार घेऊन लोकांनी त्याचे जन्मस्थान, तो जास्त करून कुठे राहिला असेल याबद्दल अनेक अंदाज बांधले आहेत पण त्यात एकवाक्